Posts

Showing posts with the label लिळा

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

Image
जानोपाध्यांना स्वामी या तिर्थाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "या स्थानाचे महत्त्व वेगळेच आहे . श्रीदत्तात्रय प्रभूचा नित्यसंबंध आहे. श्रीदत्तात्रेय प्रभू रोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येत असतात.  पूर्वी त्रेतायुगात कुसुमावती नगरीत देवश्रवा नावाचे ऋषी राहत होते. त्यांना आत्मऋषी नावाचा पुत्र होता. देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करून श्रीदत्तात्रेय प्रभूनां प्रसन्न केल्यामुळे ते त्याच्या घरी प्रगट झाले. देवश्रवा श्रीदत्तात्रेय प्रभूच्या भजनपूजनात मग्न असताना त्याचा शिष्य पाचांळराजा आपल्या गुरूच्या भेटीला आला असता त्याला तेथे श्रीदत्तात्रेय प्रभूंचे दर्शन झाले. देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करुन, विनवुन श्रीदत्तात्रेय प्रभूनां पंचाळेश्वरला आपल्या राजसदनी आणले. पाचांळराजाने श्रीदत्तात्रेय प्रभूनां राजसिहांसनी बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. आणि अनेक प्रकारची स्तुतीस्तवन करुन त्यानीं श्रीदत्तात्रेय प्रभूनां विनंती केली, "हे आर्तदानी भक्तवत्सला माझी सगळी चितां नष्ट करुन माझा पुनर्जन्म चुकवावा." "हे धर्मशील राजा, आम्हाला तुझ्या हातून काह...

अक्षयतृतीयेला लाहामाइसाच्या क्रियेचा स्विकार

अक्षयतृतीयेला लाहामाइसाच्या क्रियेचा स्विकार अक्षयतृतीयेच्या दिवशी लखुबाईसांनी स्वामींना विनंती केली ," जी,जी,मी सर्वज्ञांच्या ठिकाणी अक्षयतृतीया करीन . स्वामींनी लखुबाईसांची विनंती स्विकारली . लखुबाईसांनी उपहार केला. सर्वज्ञांना तेल,उटणे लावून आंघोळ घातली.पूजावसर केला, ताट तयार केले,स्वामींचे जेवण झाले गुळुळा केला, पानांचा विडा दिला. सर्वज्ञांना घागरीत काही वेगवेगळे पदार्थ भरुन दिले ते पाहून लाहामाईसा दु:ख करु लागल्या 'ही लखुबाइसा दैवाभाग्याची . हिने सर्वज्ञानच्या ठाइ अक्षयतृतीया केली. मी दुर्दैवी माझ्या जवळ काहीच नाही, असे म्हणून दु:ख करु लागली. तेव्हा सर्वज्ञांनी लाहामाईसाला विचारले बाई, यांनी आमच्या ठायी अक्षयतृतीया केली . तुम्ही का करत नाही?  लाहामाईसा स्वामींना म्हणतात ,जी,जी,मजजवळ तर काहीच नाही? मग सर्वज्ञांनी सांगितले ," ही घागर घेऊन जा आतबाहेर धुवा.खोल पाण्यात बुडवून भरा व आम्हाला द्या. "मग आम्ही तुमची अक्षयतृतीया संपूर्ण चरितार्थ करु, "लाहामाइसा पटकन हो जी म्हणून घागर घेऊन गंगेला गेल्या आत बाहेर घासून स्वच्छ धुवून खोल पाण्यात बुडवून भरुन आणली व सर्वज्ञ...

स्वामी श्री चक्रधर आणि दसरा

सिमोल्लंघना बिजें करणे ☘️सर्व अच्युतगोत्रीय परिवारास दसरा पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!! 🌻दसऱ्याच्या दिवशी भल्या पहाटे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अभंग्यस्नान झाले.सोनेरी नक्षीदार नवीन वस्त्र परिधान करून श्री स्वामी रामदरणा राजा समवेत घोड्यावर स्वार होऊन नगराबाहेरील तळ्याकाठी असलेल्या आपट्याच्या झाडाकडे गेले.  तेथे श्री स्वामींनी "सोने देया सोने घेया" असे म्हणून त्याची पाने सर्वाना दिली.  सिमोल्लंघन साजरे केले.मग नगरजनांना दर्शन देत राजवाड्यात श्री स्वामींचे आगमन झाले.तेथे रामदरणा राजाच्या मातेने पंचारती ओवाळून श्री स्वामींचे यथोचित पूजन केले. सर्व अच्युतगोत्रीय परिवाराने या अपूर्व लिळेचे स्मरण करीत दसरापर्व साजरे करावे. 🙏🌷दंडवत प्रणाम 🌷🙏